Subscribe Us

निधी कोट्यावधींचा ,कामे मात्र निकृष्ट? तक्रार करूनही प्रशासन सुस्त, दहिफळ येथील प्रकार

तेरणेचा छावा/धाराशिव:-
 कळंब तालुक्यातील दहिफळ येथे विविध विकासकामा अंतर्गत कोट्यावधी रुपयांची कामे चालू आहेत परंतु ही कामे दर्जाहीन होत असल्याची तक्रार ग्रामस्थातून ऐकावयास येत आहे.       याविषयी सविस्तर असे की दहिफळ येथील सिमेंट रस्ते, पेवर ब्लॉक बसवणे, शेतरस्ते यासह विविध विकासकामे चालू आहेत तर काही कामे अर्धवट उरकूनच बिल मात्र संपूर्ण उचलल्याची चर्चा गावकऱ्यातून एकावयात येत आहे. 
   गावांतर्गत सिमेंट रस्ते करून दोन ते तीन महिने झाले असताना  रस्त्यावरील खडी उघडी पडून खड्डे पडत आहेत, कामावर कुठेही कोणत्या योजनेतून हे काम झाले आहे याचे त्याची इस्टिमेट व मुदत किती याचे बोर्डही पहावयास मिळत नाहीत.पेपर ब्लॉग चे काम करताना कशाप्रकारे करणे गरजेचे आहे, पेवर ब्लॉक बसवताना लेवल मध्ये बसवले लागतात का खालीवर बसवावे लागतात तसेच त्यांचा दर्जा कोणत्या प्रकारचा असावा लागतो. याची प्रशासनाने शहानिशा केली की नाही असा प्रश्न नागरिकांना पडत आहे कारण पेवर ब्लॉक एका लेवल मध्ये न बसवता खाली वर बसवले असल्यामुळे  नागरिकांच्या पायाला इजा होण्याचा धोका संभवत आहे. काही ठिकाणच्या शेत रस्त्याच्या कामाचा तर दर्जा पाहायलाच नको.शेत रस्ता करायच्या आधी ती जागा व्यवस्थित होती परंतु शेत रस्ता केल्यावरच खराब झाली असल्याची वस्तुस्थिती तसेच शेत रस्त्याची नेमके रुंदी किती लांबी किती त्यावरील टाकायचे मटेरियल काय हे तर विचारायलाच नको, तसेच रस्ता करत असताना पाण्यासाठी चारी खोदणे,नळी टाकणे, हे कुठे पहावयासही मिळत नाही. यामध्ये आणखीही बरीच अनियमितता पहावयास मिळते.   
  अशा प्रकारची कामे जर होत असतील तर प्रशासन काय नुसतं? अशा प्रकारची लोकभावना ऐकावयास येत आहे करण्यात आलेली अशा प्रकारचे कामे झालेली आहेत  प्रकारची कामे उरकून घेऊन शासनाच्या कोट्यावधी रुपयांना गंडा घालण्याचे काम झालेले आहे. अशा प्रकारची बोगस कामे करत असताना प्रशासन मूग गिळून गप्प का होते, ज्यांची जबाबदारी होती त्यांनी दर्जेदार कामे का करून घेतली नाहीत. तसेच या कामात अधिकाऱ्यांची काही आर्थिक देवाण-घेवाण झाली की काय! कारण तेरीबीचुप आणि मेरीबिचुप भूमिका कशासाठी आहे. कारण ग्रामस्थांनी ग्रामसभेत याविषयी तक्रार करून सुद्धा याची ना प्रशासनाने ना संबंधितांनी दखल न घेतल्याचे दिसून येत आहे त्यामुळेच अशा प्रकारची बोगस कामे करून शासनाची लुटमार व दिशाभूल करणाऱ्या संबंधित गुत्तेदार व संबंधित अधिकार्‍यावर  कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थातून जोर धरू लागली आहे. तसेच या सर्व कामाची तक्रार लवकरच पालकमंत्र्याकडे  करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थातून सांगण्यात येत आहे.
(भाग- १)

Post a Comment

0 Comments