Subscribe Us

बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपल्याला अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत त्याचा योग्य वापर करून यशाच्या मार्गाने जायला हवे.. सिद्धार्थ भांगे

यूपीएससी एमपीएससीसह इतर कुठल्याही परीक्षेत यश मिळवयाचे असेल तर बाबसाहेबांमुळे मिळालेल्या सर्व सोयीसुविधांचा फायदा घेऊन यश संपादन केल पाहिजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपल्याला अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत त्याचा योग्य वापर करून यशाच्या मार्गाने जायला हवे असे विचार व्यक्त केले आहेत नुकतेच यूपीएससी झालेले सिद्धार्थ भांगे यांनी.
      यूपीएससी या परिक्षेत यश संपादन केल्यामुळे त्यांचा  उस्मानाबाद येथील अजिंठा नगर येथे गुरुवार दि.8 जून रोजी नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी भांगे बोलत होते.
अजिंठा नगर येथे आयोजित केलेल्या या सत्कार कार्यक्रमात सिद्धार्थ भांगे यांच्यासह त्यांच्या आई वडिलांचा सत्कार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक बाबासाहेब कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला.
मूळचे लातूर जिल्ह्यातील उजनी या गावचे रहिवाशी असणारे सिद्धार्थ भांगे याचं कुटुंब हालाकीच्या परिस्थितीमुळे उपजीवेकेसाठी पन्नास वर्षांपूर्वी पुण्यात स्थलांतरित झाले.इथेच सिद्धार्थ यांच बारावी आणि पदवीचे शिक्षण पूर्ण झाले बारावी नंतर यूपीएससी करण्याचं ठरवलं आणि अवघ्या 23 व्यावर्षी दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी हे यश संपादन करून 700 व्या रँकने ते यशस्वी झाले आहेत यासाठी त्यांनी अभ्यासातील सातत्य सोडलं नाही त्याच बरोबर अभ्यास एके अभ्यास न करता आपले छंद ही जोपासले नियमित व्यायाम मेडिटेशन या गोष्टीही करत राहिले त्यामुळे हे यश मिळाल्याचे यावेळी भांगे यांनी सांगितले आयुष्यात काय करायचे हे पक्के ठरवावे आणि त्यानुसार मार्गक्रमण करावे असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला .
यावेळी त्यांच्या सोबत आलेल्या आज्जी आजोबा चुलते आदींचा सत्कार अजिंठा नगर वासीयांच्या वतीने करण्यात आला.या कार्यक्रमासाठी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब कांबळे, लोहारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते भैय्यासाहेब नागटीळे, विकास बनसोडे मृत्युंजय बनसोडे,रमेश गंगावणे,व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलंकार बनसोडे यांनी तर आभार विकास बनसोडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments