उस्मानाबाद / तेरणेचा छावा:-
राज्याचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या पुढाकारातून बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात शहरासह ग्रामीण भागातील अनेकजण प्रवेश करीत आहेत.जिल्हा प्रमुख सुरज साळुंके यांच्या पुढाकारातून पक्षप्रवेश होत असून शिवसेना पक्ष संघटनेला दिवसेंदिवस बळकटी मिळत आहे.
येडशी व तडवळा ही तेरणा पट्ट्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजली जाणारी गावातील मंडळींनी मोठ्या प्रमाणावर बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे तेरणा पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची फळी निर्माण होताना दिसत आहे.
तडवळा येथील युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते देवदत्त मोरे, तडवळा गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य नाना वाघ, पंचायत समिती मा सदस्य सुधीर करंजकर , उपसरपंच प्रताप करंजकर , जवळा येथील उपसरपंच आप्पासाहेब गुळवे , ग्रामपंचायत सदस्य, सुभाष धनके गणेश करंजकर, धनंजय भालेराव, विजय पवार, सोमनाथ करंजकर, योगेश भोगले, सुनील डिकरे, हरून शेख ग्रामपंचायत सदस्य कसबे तडवळे, लखन वाघमारे सदस्य जवळा, किशोर कदम, बाळासाहेब करंजकर यांनी प्रवेश केला.
राष्ट्रवादी युवकचे उपजिल्हा अध्यक्ष जयंत भोसले, येडशी उपसरपंच पती शशांक गोपाळराव सस्ते,तुषार शहाजी शिंदे ग्रामपंचायत सदस्य, नितीन शिंदे सदस्य, संतोष पवार सदस्य, मच्छिंद्र पवार सदस्य, गुरुनाथ शिंदे सदस्य, अविनाश तौर सदस्य, सुनील पाटील सदस्य, सोमनाथ बेदे सदस्य, प्रताप ढोणे सदस्य, अकबर मेहबूब तांबोळी माजी सभापती, सदाशिव तोडकरी सामाजिक कार्यकर्ते, अजय पवार, सोनू गरड, शिवाजी नलावडे, अँड.धैर्यशील सस्ते, रोहित भोसले यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होते.यावेळी शिवसेना सह-संपर्क प्रमुख अनिल खोचरे, तालुकाप्रमुख अजित लाकाळ व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तसे धर्मवीर आनंद दिघे यांची प्रेरणा घेऊन बाळासाहेबांची शिवसेना पक्ष मार्गक्रमण करत आहे. गेल्या सहा महिन्यात राज्य सरकारने केलेली विविध लोकोपयोगी विकासकामे तसेच सर्व स्तरातील घटकांकरिता घेतलेले निर्णय ध्यानात घेऊन अनेकजण पक्षात प्रवेश करत आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्याने कायमच शिवसेनेचा विचार बळकट करण्याचे काम केले आहे, त्याच जिल्ह्यातून बाळासाहेबांची शिवसेना पक्षावर विश्वास ठेवून सामील होणाऱ्या कार्यकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरवू तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रश्न देखील लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन मंत्री डॉ सावंत यांनी दिले व प्रवेश केलेल्याना भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments