उपोषणाचा 5 वा दिवस
ओबीसी समाजाच्या आरक्षणावर घाला घालू नये या मागणीसाठी वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी गोविंदपुर येथे शंकरराव कराड,नानासाहेब मुंडे दोघांनी 5 व्या दिवशी उपोषण सुरू असताना शनिवार दिनांक 22 जून रोजी मा.ना.श्री छगनरावजी भुजबळ यांच्या आदेशानुसार समता परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष आबासाहेब खोत व तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,समता परिषदेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष बिभिषण खुने यांचे शिष्टमंडळाने भेट दिली.
आबासाहेब खोत यांनी ओबीसी नेते मा.श्री.छगनरावजी भुजबळ साहेब यांना फोनद्वारे उपोषण कर्त्यांचे संभाषण करून देऊन भुजबळ साहेब यांनी उपोषण सोडण्या संदर्भात सुचना केली.
तसेच रवि कोरे यांनी धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांना फोन करून उपोषणाची दखल घेण्यासंदर्भात विनंती केली.जिल्हाधिकारी यांनी भेट देतो असे आश्वासित केले.
याप्रसंगी समता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष डोरले, धाराशिव जिल्हा तेली समाज संघटनेचे कळंब तालुका अध्यक्ष सचिन देशमाने,समता परिषदेचे कळंब तालुका अध्यक्ष जयदेवराव गोफणे, शशिकांत खुने, भाऊसाहेब ओव्हाळ,शाम गायकवाड हनुमंत पंडीत,शुशिल झांबरे,अंगद माळी, लालासाहेब माळी,यांच्यासह ओबीसी समाज बांधव व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments