Subscribe Us

ऑनलाईन गेमिंगच्या जीवघेण्या मोहजाळातून तरुणाई वाचणार – खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर



                                          संग्रहित
           तंत्रज्ञानामुळे व्यक्तींचे जिवन सुसाहय होत असताना तरुण पिढीच्या हातात मोबाईल आला मोबाईल सोबतच त्याची काळी बाजू असणाऱ्या अनेक गोष्टी आल्या. यामुळे तरुण पिढी वाईट अशा ऑनलाईनवर उपलब्ध असणाऱ्या विविध गेमच्या आहारी जावून नैराश्यात आत्महत्यासारख्या पाऊल उचलू लागला. आई वडीलांनी व कुटुंबियांनी लहानाचा मोठा केलेला घर संभाळणारा व्यक्ती जंगली रमी, ड्रीम -11, रमी सर्कल, ऑनलाईन तीन पत्ती, ऑनलाईन पोकर, लकी चिकन रोड, चक्री यासारख्या ऑनलाईन गेमच्या फसव्या जाहीरातीस भूलून लवकर श्रीमंत होण्याचे स्वप्ने पाहू लागला. यातच आपण नकळत ऑनलाईन गेमच्या मोहजाळात आडकत गेलो आहे. हे लक्षात आल्यानंतर डोक्यावर प्रचंड कर्ज झाल्याची जाणीव त्यास आत्महत्याकडे घेवून गेली. 
           दि. 16/06/2025 रोजी धाराशिव जिल्हयातील बावी कावलदरा येथील तरुण लक्ष्मण जाधव याने या ऑनलाईन गेमच्या व्यसनामुळे झालेल्या कर्जाच्या नैराश्यातून स्वत:चे कुटुंब विष देवून संपविले व स्वत: गळफास घेवून आत्महत्या केली. या आगोदर कुर्डुवाडी येथील तरुणाने अशाच पध्दतीच्या गेमच्या व्यसनापायी 8 एकर जमीन व दोन ट्रॅक्टर विकल्याची घटना घडली होती ही दोन प्रातीनिधीक उदाहरणे असून महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण देशभरात ऑनलाईन जुगाराच्या मोहातून अनेक तरुणांनी जिवन संपविल्याच्या घटना घडल्या आहेत. 
           खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या संवेदनशिल मनास ही गोष्ट अस्वस्थ करत होती. माझा तरुण कुठेतरी ऑनलाईन व्यसनापायी भरकटत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी या अनुषंगाने शुन्य प्रहार काळामध्ये लोकसभेच्या अधिवेशनात केंद्र सरकारचे अत्यंत महत्वपुर्ण अशा सामाजिक प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यातच उशीरा का होईना झोपी गेल्याचे सोंग घेणारे भाजप सरकार जागे झाले व सर्व प्रकारच्या ऑनलाईन गेमवर बंदी घालणारा कायद्याचा मसुदा लोकसभेच्या पटलावर ठेवला. यापुर्वी आ. कैलास पाटील यांनी देखील या प्रश्नाच्या अनुषंगाने विधासभेच्या पावसाळी अधिवेशन काळात या विषयावर प्रश्न उपस्थित केला होता. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जनतेच्या प्रश्नाशी प्रामाणिक राहून काम करणाऱ्या खासदार व आमदार यांच्या प्रयत्नास यश येताना दिसत आहे. 
           ऑनलाईन गेमवर बंदी घालणारा कायदा अस्तीत्वात आल्यास तरुण वर्ग आपोआपच या प्रकारच्या व्यसनापासून दुर राहील व आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणार नाही. आई वडीलांनी मोठी स्वप्नी पाहात मोठा केलेला मुलगा वृध्दापकाळात त्यांचा आधार राहील. अनेक कुटुंबे ऑनलाईन गेमच्या जुगारामुळे नष्ट होण्यापासून सावरतील यात शंका नाही.   
       खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केंद्र शासनातील मंत्री अश्विनी वैष्णव यांचे सदर बंदी कायद्याबद्दल आभार मानले आहेत. 
              

Post a Comment

0 Comments